जीवनशैली

गौरी आगमनापूर्वी सर्व पात्र लाभार्थींपर्यंत आनंदाचा शिधा पोहोचवा : पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश

गौरी आगमनापूर्वी सर्व पात्र लाभार्थींपर्यंत आनंदाचा शिधा पोहोचवा – पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश
सातारा:प्रतिनिधी –
राज्यातील गोरगरीब जनतेला गौरी गणपती उत्सव आनंदाने साजरा करता यावा, यासाठी शासनाने आनंदाचा शिधा उपलब्ध करून दिला आहे. सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 48% पात्र लाभार्थींना आनंदाचा शिधा वितरित झाला असून उर्वरित सर्व पात्र लाभार्थींपर्यंत गौरी आगमनापूर्वी आनंदाचा शिधा संच पोहोचवावेत. त्यासाठी यंत्रणेने आवश्यक ती सर्व दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थींना गौरी गणपती उत्सवानिमित्त चार शिधाजीन्नस समाविष्ट असलेला संच अर्थात आनंदाचा शिधा पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्याहस्ते वितरित करण्यात आला.
देगाव रोड, एमआयडीसी कोडोली, सातारा येथील एम.बी. पिंगळे यांच्या रास्त भाव धान्य
दुकानात आयोजित कार्यक्रम प्रसंगी जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार राजेश जाधव, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी अमर रसाळ, सरपंच सतीश माने, रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, श्री. चंद्रकांत जाधव, श्री. आनंदराव कणसे, एम.बी. पिंगळे यांच्यासह लाभार्थीं, नागरिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »