सुदर्शन पाटसकर यांची तळमळ आणि पक्षनिष्ठा वाखाणण्याजोगी आहे : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

सुदर्शन पाटसकर यांची तळमळ आणि पक्षनिष्ठा वाखाणण्याजोगी आहे : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
कराड : ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शी व गतीमान सरकारची विकासकामे आणि शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यादृष्टीने भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस सुदर्शन पाटसकर यांनी कराड शहरात सुरु केलेले भारतीय जनता पार्टी विकासपर्व जनसेवा कार्यालय प्रयत्नशील राहणार आहे. निवडणुकांच्या काळात पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडत संपूर्ण महाराष्ट्र पालथा घालणाऱ्या सुदर्शन पाटसकर यांची तळमळ आणि पक्षनिष्ठा वाखाणण्याजोगी आहे, असे गौरवोद्गार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढले.
सुदर्शन पाटसकर यांच्या विकासपर्व जनसेवा कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. डॉ. अतुलबाबा भोसले, विधानपरिषदेचे आ. विक्रांत पाटील, भाजपचे सरचिटणीस राजेश पांडे, बाजप किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, तालुकाध्यक्ष धनाजी पाटील, शंकर शेजवळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री बावनकुळे म्हणाले, सातारचे खासदार आणि जिल्ह्यातील सर्व आमदारही महायुतीचे असल्याने निर्माण झालेल्या भाजपच्या मजबूत फळीला कोणाचीही दृष्ट लागू नये. कराड दक्षिणचा आमदार भाजपचाच असे, हा माझा विश्वास येथील जनतेने सार्थ करून दाखवला. आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी मोठे परिवर्तन घडवले आहे. आता त्यांनी सांगितलेले एकही काम शिल्लक राहणार नाही. त्यामुळे केंद्र व राज्याच्या सर्व शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पुढील पाच वर्षांत कराड हे राज्यातील सर्वोत्तम शहर असेल, अशी ग्वाही ना. बावनकुळे यांनी दिली.
ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकसीत महाराष्ट्राचा संकल्प केला आहे. तोच पुढे नेण्यासाठी सुदर्शन पाटसकर यांनी विकासपर्व जनेसवा कार्यालय सुरू केले आहे. त्यांच्या माध्यमातून जनतेची कामे मार्गी लावली जातील. सुदर्शन यांनी घरावर तुळशीपत्र ठेवून निवडणूक व करोना काळात केलेल्या कार्याचा अभिमान आहे. त्यांच्या कार्याची नक्कीच दखल घेऊन त्यांनी जनतेचे आणलेले एकही काम मंत्रालय स्तरावर प्रलंबित राहणार नाही, अशीही ग्वाही ना. बावनकुळे यांनी दिली.
तसेच 45 लाख शेतकर्यांना शेतीपंपांचे वीज बिल शून्य रुपये येईल. 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर जनतेला इन्कमटॅक्स भरावा लागणार नाही. लाडकी बहीण योजना पुढे सुरू राहणार असून भविष्यात ती आणखी प्रभावी केली जाणार आहे. 48 तासात जातीचे दाखले, पानंद गाव रस्ते तातडीने खुले केले जातील, असेही ना. बावनकुळे यांनी सांगितले.
आ. डॉ. अतुल भोसले म्हणाले, ना. बावनकुळे यांनी कराड दक्षिणचा आमदार भाजपचा असेल, असे दिलेले वचन त्यांनी पूर्ण करून दाखविले. उर्जामंत्री असताना त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. महसूल मंत्रीपदाच्या काळात शंभर दिवस विशेष कामांचा निर्णय घेतला. महसूल विभागात पारदर्शकता आणि गतीमानता आणली आहे. सुदर्शन पाटसकर यांनी जनतेप्रती घेतलेले सेवावृत व त्यांचे अनुकच कार्य उल्लेखनीय असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रास्ताविकात सुदर्शन पाटसकर यांनी केंद्र व राज्य सरकारच्या सर्व शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी विकासपर्व जनसेवा कार्यालय सुरु केल्याचे सांगितले. तसेच वडील विष्णू पाटसकर यांच्याकडून मिळालेला राजकीय, सामाजिक वारसा चालवताना भाजयुमो जिल्हाध्यक्ष, राज्य सचिव, राज्य उपाध्यक्ष ते आज राज्याचा महामंत्री पर्यंतची केलेली वाटचाल सांगितली. एकनाथ बागडी यांनी आभार मानले. कार्यक्रमास भाजपचे पदाधिकारी, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.